एमपीएससी, युपीएससी याशिवाय बँका तसेच इतर अनेक संस्थांच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कशी करावी? त्याचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात? याविषयी या परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन...
राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पाहिल्यास राज्यव्यवस्था आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण हा पूर्वपरीक्षेचा आणि मुख्य परीक्षेला पूर्वपरीक्षेच्या घटकासह जिल्हा प्रशासन शिक्षण व्यवस्था, पक्ष आणि दबावगट, प्रसारमाध्यमे, निवडणूक प्रक्रिया, केंद्र व राज्य सरकारचे विशेष अधिकार व समाजकल्याण कायदे, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण असा व्यापक आहे.
अधिकारी होण्याची सक्षमता उमेदवारात आहे की नाही, याचा अंदाज मुलाखतीत घेतला जातो. उमेदवारामधील आत्मविश्वास, दृष्टिकोन, प्रसंगावधान, चातुर्य, परिस्थिती हाताळण्याची हातोटी, मानसिक कणखरता, संयम, समाजाशी सुसंवाद साधण्याची कला इत्यादीची ही परीक्षा असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १८६९ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक होण्याची संधी यावर्षी दिली आहे.
एमपीएससी आयोगाने काही दिवसांपूर्वी सहाय्यक पदासाठी परीक्षेची जाहिरात दिली. ही परीक्षा २९ सप्टेंबर २०१३ या दिवशी होणार आहे. पण या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण बदलला आहे. पोलिस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी यापूर्वी समान अभ्यासक्रम होता. आता तो बदलला आहे.
नक्कीच एमपीएससी कात टाकत आहे. परीक्षांमध्ये प्रश्नातील तोचतोचपणा संपूर्ण वगळला आहे. त्यामुळे अभ्यास साहित्यामध्येदेखील बदल अपेक्षित आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद केला आहे. त्यातील काही ठरावीक मुद्दयांची आपण चर्चा करूया. शासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते.
मुलाखत हा केंद्र लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण टप्पा असतो. उमेदवाराचे अंतिम यादीतील स्थान निश्चित करण्यात हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच यात जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवणे अत्यावश्यक आहे. यूपीएससीने २७५ गुणांसाठी तर एमपीएससीने १०० गुणांसाठी मुलाखतीचा अंतिम टप्पा निर्धारित केलेला आहे. लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. मुलाखतीचा हेतू उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व सनदी सेवा पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय.
यश प्रत्येकालाच हवं असतं, पण ते मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणंदेखील आवश्यक असतं. बरेचदा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नाही. अशा वेळी पदरी निराशा येऊ शकते. पण त्यावेळी आपण केलेल्या चुकांचं निरीक्षण करून त्या चुका पुन्हा न करता अचूकपणे मार्गक्रमण केल्यास यशाची पायरी नक्कीच चढता येऊ शकते. यश मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
आज विद्याथ्र्यांना अद्ययावत विज्ञानतंत्र्, तंत्रज्ञान, शिक्षण-करिअरमधील प्रचंड स्पर्धा यासारख्या वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. ते पेलताना विद्याथ्र्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याची कसोटी लागते. मुलाचा शिक्षणक्रम निवडण्याच्या वेळेस मुलाची भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासाची पातळी पालकांना समजणे अधिकाधिक अवघड होत आहे
ज्यांना परीक्षेची खरोखर भीती वाटत नाही, अशा विद्याथ्र्यांमध्ये काही गुण प्रकर्षाने दिसतात. ते म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाचे नियोजन व सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सर्वात महत्त्वाच्या असतात. या तिन्ही बाबी जन्मजात नसतात; परंतु प्रयत्न केल्यास त्या सहज आत्मसात करता येतात. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नांची गरज असते. |
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|